शहिदांना पंतप्रधानांसह इतर वरिष्ठांची भावपूर्ण श्रद्धांजली!

नवी दिल्ली:- पुलवामा येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या पार्थिवाला काल संध्याकाळी दिल्ली येथील पालम हवाई विमानतळावर आणण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि तीनही सैन्याच्या प्रमुखांनी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

गुरुवारी झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या पार्थिवाला शुक्रवारी सायंकाळी दिल्ली येथील पालम विमानतळावर आणण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय दुःखित होऊन श्रद्धांजली अर्पण केली. या दरम्यान त्यांनी दोन्ही हात जोडत नमस्कार करून शहिदांच्या पार्थिवाला परिक्रमा घातली.

पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री तसेच गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, सूचना तथा प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख तसेच इतर मान्यवर लोकांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page