सिंधुदुर्ग
-
येवा कोकण आपलाच आसा! तेही मुंबईत!!
मुंबई:- असलदे मधलीवाडीतील यशस्वी उद्योजक सन्मा. श्री. दयानंद लोके मुंबई शहरात आजपासून ‘लोके फूड प्रोडक्ट’ नावाच्या शॉपचा शुभारंभ करीत आहेत. येथे कोकणातील सर्व वस्तू व उत्पादने, मालवणी मसाला, लोणचे, कोकम, आगुळ, सरबत, काजू, फणस-आंबा पोळी, नारळ, सर्व प्रकारचे लाडू, मालवणी खाजा अशाप्रकारचे सर्व मालवणी व कोकणी वस्तू चाकरमान्यांना दर्जेदार व किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहेत.
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ
सिंधुदुर्गनगरी:- शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हिच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेव्दारे माझ्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. प्रत्येक
-
भोगवे येथील मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
सिंधुदुर्ग:- मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करताना मच्छिमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदय विकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का लागणे इत्यादी आपत्तीमध्ये प्राथमिक उपचार काय करावे? याबद्दलची शास्त्रीय माहिती मच्छिमारांना असणे गरजेचे आहे; जेणेकरून संभाव्य धोक्यामुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. या अनुषंगाने मच्छिमारांना
-
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का): खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2024 अशी होती. तथापि योजनेत सहभाग वाढविण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी
-
युगपुरुष पी. ए. कर्ले साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित जीवन जगणारे ज्ञानयोगी – कर्मयोगी युगपुरुष पुंडलिक अंबाजी कर्ले साहेब! देवगड तालुक्यातील शिरगांव पंचक्रोशी म्हटल्यावर ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, ज्यांचा आदर्श प्रत्येकाच्या जीवनात असावा आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उभा केलेला हिमालय पाहावा; असे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे ज्ञानयोगी – कर्मयोगी युगपुरुष पुंडलिक अंबाजी कर्ले साहेबांचं! शिरगांवसारख्या ग्रामीण भागात आपली नोकरी यशस्वीपणे सांभाळत शिक्षण
-
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचे निकष शिथिल
योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी शासनाचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती मुंबई:- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. लाभार्थी महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी
-
जिल्ह्यात ७ ते ८ जून रोजी यलो अलर्ट; तर दि.९ ते ११ जून रोजी ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ८ जून २०२४ रोजी यलो अलर्ट तर दि. ९ ते ११ जू न २०२४ रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात दि.७ व ८ जून २०२४ या कालावधीत गडगडाट होवून पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच दि. ७ जून रोजी ५० ते ६० किमी
-
विशेष लेख… राणेंच्या विजयाचे शिल्पकार!
नारायण राणे विनायक राऊत मताधिक्य आमदार १) कुडाळ ९२४१९ ५०४२४ +४१९९५ नितेश राणे २) सावंतवाडी ८५३१२ ५३५९३ +३१७१९ दीपक केसरकर ३) कुडाळ ७९५१३ ५३२७७ +२६२३६ वैभव नाईक ४) रत्नागिरी ७४७१८ ८४७५५ -१००३७ उदय सावंत ५) चिपळूण ५९९९२ ७९६१९ -१९६२७ शेखर निकम ६) राजापूर ५३३८५ ७४८५६ – २१४७१ राजन साळवी पोस्टल ३१७५ ४१३२ -९५७ ४४८५१४ ४००६५६
-
संपादकीय… आता राणेंनी विकासाचे कमळ फुलवावे!
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विद्यमान खासदार विनायक राऊत यांची हॅट्रिक रोखली आणि कोकणात कमळ फुलविले. राणे यांच्या विजयाचे व राऊत यांच्या पराभवाचे फॅक्टर तपासण्यापूर्वी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी राणे यांना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन कार्य करावे लागेल. प्रशासनावर वचक असणारा आक्रमक नेता म्हणून राणे यांची ओळख आहे. तो सकारात्मक वचक ठेवून मूलभूत
-
संपादकीय… रत्नागिरी-सिंधुदुर्ग-लोकसभेच्या निकालाचे कवित्व!
उद्या केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यापैकी एकजण निवडून येईल! जिंकणाऱ्या आणि पराभूत होणाऱ्या दोघाही सन्मानिय नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांतता ठेवणे गरजेचे आहे. कारण ही निवडणूक पाच वर्षांसाठी असेल; एवढेच नाहीतर पुढील सहा महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कोणीही कायमचा विजयी नसतो; म्हणून जिंकून येणाऱ्याने पुढील पाच वर्षासाठी आपल्या










