संपादकीय
-
अभिनंदनीय निवड!
सामाजिक क्षेत्रात वावरताना प्रामाणिक आणि कार्यक्षमपणा हे गुण नेहमीच उपयुक्त असतात. त्याशिवाय सामाजिक कार्यात आपण करीत असलेल्या कार्यावर दृढ विश्वास असला पाहिजे. तेव्हाच सामाजिक क्षेत्रात उत्तोरोत्तर जबाबदाऱ्या आणि कार्यक्षेत्र वाढविणारी पदं आपल्याकडे येतात. कारण आपली क्षमता भूतकाळात कार्याने सिद्ध झालेली असते. आमचे मित्र श्री. संतोष नाईक आणि श्री. मनोज तोरस्कर यांच्या बाबतीत आम्ही सन्मानाने-प्रेमाने वरील
-
लेखांक दुसरा- एसआरए योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आणि झोपडी मालकांचा विनाश!
एसआरए योजनेंतर्गत झोपडीधारकांचे राहणीमान दर्जेदार व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने ९५ साली एक चांगली योजना अस्तित्वात आणली; पण झोपडपट्टीवासीयांचे राहणीमान सुधारण्याऐवजी सुमारे ७० टक्के ठिकाणी बिल्डर, राजकारणी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या अर्थपूर्ण सलगीतून भ्रष्ट व्यवस्था निर्माण झाली; ती खरोखरच सर्वसामान्य कष्टकरी जनतेला बरबाद करणारी ठरली. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्देश खूपच चांगला होता त्यांना मुंबईतील
-
विशेष लेख- एसआरए योजनेत समाविष्ट होताना विचार करा! अन्यथा घात ठरलेलाच!!
विशेष लेख- सावधान! सावधान!! सावधान!!! एसआरए योजनेत समाविष्ट होताना विचार करा! अन्यथा घात ठरलेलाच!! सावधान!!! नेहमी जो सावध असतो, तो सुखी असतो! प्रत्येकाने किमान स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दल सावध राहिले पाहिजे. नाहीतर आपला आत्मघात ठरलेलाच! आपले कुटुंब कधी भिकेला लागेल ते सांगता येणार नाही. कारण आपल्या आजूबाजूला फिरणारी सुटाबुटातील श्वापदं आपल्या स्वार्थासाठी, फक्त आणि फक्त
-
संपादकीय- ध्वनीप्रदूषणाची धर्मांधता!
सध्या ध्वनी प्रदूषणाबाबत जोरदार चर्चा आणि आक्रमकपणे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. धार्मिक स्थळावरून ध्वनीक्षेपकाद्वारे होणारे ध्वनी प्रदूषण हे कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही आणि देशाचा कायदा हा धर्मापेक्षा आणि तथाकथित धार्मिक ध्वनी प्रदूषणापेक्षा सर्वोच्च असतो; याचे भान जपायला हवे! राजकारणाचे अंतिम ध्येय सत्ता प्राप्ती असते आणि त्या ध्येयाने पछाडलेले राजकारणी माथी भडकविण्यासाठी भावनात्मक आव्हाने-प्रतिआव्हाने देतात. त्यामध्ये समाजाचे-देशाचे
-
श्रीमाऊली `देवि’चा दास गेला देवीच्या सेवेशी हजर!
आज सकाळी देविदास राजाराम परब यांचे ६२ व्या वर्षी दिवंगत झाले. अतिशय दुःखद बातमी! त्यांच्या बाबतीत बोलणे आणि लिहिणे खरोखरच सहजसोपे नाही. आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता; पण अचानक काळाने घाला घातला आणि देविदास परबांचं पार्थिव घरी आणावं लागलं. अशा व्यक्ती जेव्हा अशा अचानक सोडून जातात तेव्हा शब्द निःशब्द होतात आणि नयनातून आपोआप अश्रू
-
संपादकीय- कोकण सर्वांगिण विकसित करण्यासाठी प्रयास करणारा नेता हरपला!
प्राध्यापक महेंद्र नाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला वेदनादायी होती; कारण खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान आणि सर्वांगिण विकसित कोकणचे स्वप्न पाहणारा नेता म्हणून त्यांनी त्यासाठी केलेले प्रयास आम्ही अगदी जवळून पाहिले. त्यांच्यासारखा अभ्यासू नेता जेव्हा जातो तेव्हा अतीव दुःख होते. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजात जन्माला आलेले नाटेकर सर यांनी समाजासह बहुजन समाजाच्या आणि कोकणच्या विकासासाठी जीवनभर राखलेला समर्पित
-
गांधी विचार कृतीत आणणाऱ्या जेष्ठ आदर्शाला सलाम!
ज्येष्ठ गांधीवादी- सर्वोदयी कार्यकर्ते जयवंत मटकर यांचे पुण्यात निधन! गोपुरी आश्रमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते, महात्मा गांधी प्रस्थापित वर्धा आश्रमाचे माजी अध्यक्ष, सर्वोदयी परिवाराचा आधारवड जयवंत मटकर यांचे मंगळवार दिनांक- १४, मार्च, २०२२ रोजी सायंकाळी ८.४५ वाजता पुणे येथे वयाच्या ८१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. जयवंत मटकर यांनी ऐन तारुण्यात गांधी विचारांच्या चळवळीत
-
समाजकार्यातून वैचारिक मंथन आणि वैचारिक मंथनातून समाजकार्याचा शुभारंभ!
समाजासाठी अगदी प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करण्याची मानसिकता दुर्मिळ होत असताना दुसऱ्या बाजूला स्वतःच्या नावासाठी – प्रसिद्धीसाठी समाजकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी दिसते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत बॅनरबाजी करून – सोशल मीडियाचा वापर करून जनतेच्याच पैशाने होणार्या कामांचेही श्रेय घेणारी तथाकथीत पुढारी मंडळी आमच्या सदैव डोळ्यासमोर राहते. पण आपण केलेले समाजकार्य दुसऱ्याला सांगून बढाया मारायच्या नाहीत, केलेल्या
-
रामभाऊ- मुंबई पोलीस दलातील नैतिकतेचा जाज्वल्य मूर्तिमंत आदर्श!
पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक सन्मानिय श्री. मोहन सावंत यांचे जिवलग दोस्त श्री. राम कदम खरोखरच प्रेमळ माणूस! या दोघांचे अगदी तरुणपणापासून घरोब्याचे संबंध. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होताना ह्या दोस्तांनी कधीही स्वार्थ साधण्याचा मनात विचार आणला नाही. एकमेकांबद्दलची आपुलकी जोपासली. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांमध्ये या जोडीची मैत्री सर्वश्रुत होतीच; पुढे श्री. मोहन सावंत महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत
-
स्वर्गीय स्वरमाधुर्याचा या इहलोकातील मूर्तिमंत अवतार लतादीदी!
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा – गानसम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात सुरु असताना आज सकाळी ८.१२ मिनिटांनी निधन झाले. गानसम्राज्ञी लता दीदींनी आपला देह सोडला आणि आपला सुस्वर परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. त्यांच्या जाण्याने हिंदुस्थानी मन हळहळले, दुःखीत झाले. विश्वाला प्रसन्न

