वृत्तवेध

  • सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

    सिंधुदुर्गनगरी दि.२९ (जि.मा.का): जिल्हा परिषद अंतर्गत सन २०२०-२१ साठी ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आलेले असून प्रत्येक गटातून एक याप्रमाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी प्रजित नायर याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समिती सभेमध्ये निवड करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी

    read more

  • एस.टी. कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू होण्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांचे आवाहन

    मुंबई (मोहन सावंत):- “संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत१” असे सांगतानाच ३१ मार्च पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे; असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी दोन्ही सभागृहात केले. तसेच कोणाचीही

    read more

  • दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

    मुंबई, दि. २८ :- शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नवीन व नूतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडून मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती देण्याची योजना राबविण्यात येते.

    read more

  • वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

    वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

    नागपूर, दि. २८ : राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी उद्या मंगळवारी दुपारी २ वाजता मंत्रालयातील दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात येईल. प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देऊन वीज कर्मचारी संघटनांच्या

    read more

  • महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मपुरस्कार प्रदान

    नवी दिल्ली, दि. २८: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा यात समावेश आहे. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देश-विदेशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून

    read more

  • सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील! – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

    सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): “सिंधुदुर्गमध्ये पर्यटनवाढीला वाव आहे. त्यावर लक्ष्य केंद्रीत करुन पर्यटन वाढवणं आवश्यक आहे आणि तसं होत आहे!” अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मालवण जेट्टी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष

    read more

  • जगभरातील पर्यटन कोकणात आणण्यासाठी प्रयत्नशील! – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

    सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): “जगातील पर्यटन कोकणात आणू! यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. देवगडवासियांसाठी कचऱ्याचे निर्मूलनाबाबत आणि लवकरच पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. संपूर्ण कोकणात प्रत्येक किलोमीटरला मोबाईल नेटवर्कची चांगली कनेक्टव्हीटी आणि पायाभूत सुविधा मजबूत करणार!” अशी ग्वाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये २ कोटी २२ लाख ६५ हजार रुपयांच्या

    read more

  • कुणकेश्वरच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार! – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

    सिंधुदुर्गनगरी दि.२८ (जि.मा.का): कुणकेश्वर विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. कुणकेश्वर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन आज पर्यटनमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर,. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत

    read more

  • फिनिक्स फाउंडेशन व क्षा. म. समाज आयोजित महाआरोग्य शिबिर संपन्न

    मुंबई:- `मानव सेवा हीच ईश्वर सेवा!’ हे ब्रीदवाक्याचे ध्येय समोर ठेऊन कार्य समाजसेवेचे अतुलनीय कार्य करणाऱ्या फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि क्षा. म. समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने `महाआरोग्य शिबिर-२०२२’ नुकतेच डॉ. शिरोडकर समारक मंदिर, परळ, मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी फोर्टिस रूग्णालयाच्या टीमने रक्ताच्या विविध तपासण्या, डोळे तपासणी, ईसीजी, हाडांची तपासणी करून महिलांच्या आरोग्यविषयी जनजागृती व

    read more

  • ठाकरे सरकार आणि मुंबई मनपा कारभारावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात! 

    मुंबई:- विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि मुंबई मनपा कारभारावर ताशोरे ओढले. त्यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून अगदी कायदा सुव्यवस्थेबद्दल सरकारला धारेवर धरले. अनेक गंभीर प्रकारणांकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. तर कोरोना महामारीच्या काळातही मुंबई महानगर पालिकेचा कारभारावर कसा भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतला?

    read more

You cannot copy content of this page