वृत्तवेध
-
सावित्री नदीवरील दादली पुलासह गांधारी नदीवरील पुलाची उंची वाढविणार
महाड शहरातील नुकसानग्रस्त दुकानदारांना मदतीसाठी शॉपॲक्ट परवाना नसल्यास इतर पुरावेही ग्राह्य धरणार महाडमधील वारंवार पुरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सावित्री नदीतील बेटांसह गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुंबई, दि. २७:- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका महाड शहरातील छोटे व्यावसायिक, दुकानदारांसह व्यापारांना बसला. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने मदत देण्यात येत आहे. या नुकसानग्रस्तांना मदतीसह इतर योजनांचा
-
अंबरनाथ शहरातील पाणी पुरवठा समस्या तातडीने सोडवावी
मुंबई, दि. २७:- अंबरनाथ शहराला सद्यस्थितीत जलसंपदा आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळांच्या (एमआयडीसी) जलसाठ्यांमधून पाणी पुरवठा होतो. या शहराची पाण्याची मागणी आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारे पाणी यामध्ये सध्या असलेली तफावत जलसंपदा आणि एमआयडीसीने समन्वयाने तातडीने सोडवावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अंबरनाथ शहराची पाण्याची मागणी १४० द.ल.लीटर असून प्रत्यक्षात
-
पदभरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणासंदर्भात नियमाप्रमाणे कार्यवाही करावी
मुंबई, दि. २७:- प्रकल्पग्रस्तांसाठी पदभरतीमध्ये पाच टक्के समांतर आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या आरक्षणासंदर्भातील नियमांचे सक्तीने पालन करण्यात यावे. यापूर्वी झालेल्या पदभरतीमध्ये या नियमांचे पालन झाल्यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. राज्यमंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अनुकंपाधारक, प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीतील आरक्षण आणि वन व्यवस्थापन समितीच्या कामकाजासंदर्भात
-
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रबोधन नियतकालिकाचे शताब्दी वर्ष; ‘प्रबोधन’मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन मुंबई दि; १६, शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा
-
मालवाहतूक वाहनांना मुंबई-पुण्यात वाहतूकीसाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी!
लॉकडाऊनच्या काळात वाहतूक बंद राहिल्याने मालवाहतूक वाहन धारकांवर उपासमारीची वेळ! मालवाहतूक वाहनांना मुंबई-पुण्यात वाहतूकीसाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी! जनता दल (सेक्युलर) मुंबई पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन मुंबई:- लॉकडाऊनच्या काळात वाहतूक बंद राहिल्याने मालवाहतूक वाहन धारकांवर उपासमारीची वेळ आली असून मालवाहतूक वाहनांना मुंबई-पुण्यात वाहतूकीसाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी जनता दल (सेक्युलर) मुंबई पक्षाने मुख्यमंत्र्यांना निवेदन
-
कॉस्मोपॉलिटन सोसायटीच्या आवारातील श्रीसाईनाथ मंदिरात विजयादशमी साजरी!
मुंबई:- कॉस्मोपॉलिटन को. ऑप, हौसिंग सोसायटी असोशिएशन उत्सव मंडळ व ॐ साईधाम देवालय समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही विजयादशमीचा उत्सव श्री साईनाथ महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम श्रीसाईंचे श्री. सुभाष शनिश्चर साहेब (राहणार इमारत क्रमांक २ सी) यांच्या शुभहस्ते पुजन करण्यात आले आणि त्यानंतर मंत्र-स्तोत्र पठण करण्यात आले. त्यावेळी श्री. सुभाष शनिश्चर
-
सिंधुदुर्गात सक्रिय रुग्णांची संख्या ६२१
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 50 हजार 522 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 621 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 52 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. (खालील चार्ट पाहण्यासाठी मोबाइल आडवा ‘horizontal’
-
वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.)- सन 2003-04 या वर्षापासून समाज कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गतील दलित वस्ती सुधार योजनाच्या धर्तीवर राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारथी अशा भटक्या समाजाच्या सुधारणेसाठी वसंतराव नाईक तांडा,वस्ती सुधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनाचा लाभार्थीनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे
-
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.)- सन 2011-12 या वर्षापासून समाज कल्याण विभागामार्फत रमाई आवास योजनेच्या धर्तीवर राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनाचा लाभार्थीनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा; असे आवाहन दीपक घाटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे. वैयक्तिक घरकुल योजनाची आवश्यक कागदपत्रे
-
२२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार!
मुंबई, दि. 12: येत्या 22 ऑक्टोबर 2021 पासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्यातील कोविड-19 पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 11 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णय

