सूर्यप्रकाश-मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी!

सूर्यप्रकाश घेतल्याने शरीरात आपोआप `ड’ जीवनसत्व निर्माण होतं. हे जीवनसत्व नसल्यास मानवाच्या शरीरात आजार, रोग, विकृती उत्पन्न होतात. मानवाच्या शारीरिक, मानसिक क्रियेमध्ये सूर्यप्रकाशाचे महत्व खूप आहे. सूर्य प्रकाशाला दुसरा पर्याय नाही म्हणूनच सूर्यप्रकाश शरीरावर घेतलाच पाहिजे.

सूर्यप्रकाश ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे.

होय, वसुंधरेवर मिळणारा सूर्य प्रकाश म्हणजे परमात्म्याची सर्वात मोठी देणगी आहे. आमच्या जीवनामध्ये, निसर्गचक्रामध्ये ह्या सूर्याच्या प्रकाशाचं महत्व खूप मोठं आहे. वसुंधरेवरील प्रत्येक अन्न सूर्यप्रकाशामुळेच बनतं. उर्जेचा मुळ स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. ह्या सूर्यप्रकाशामुळे वसुंधरेला खरीखुरी उर्जा मिळते. त्याचप्रमाणे वसुंधरेवरील प्रत्येक जीवाला हा सूर्यप्रकाश जीवन देत असतो. तर मानवासाठीही सूर्यप्रकाश महत्वाची भूमिका बजावितो.

आजकाल बरीच माणसं स्थूल होत चालली आहेत. चारपाच वर्षाच्या लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगावर स्थुलता वाढते आहे. ह्याचे मुख्य कारण सूर्य प्रकाशाच्या संपर्कात न येणं, हेच आहे. मैदानी खेळांचं महत्व कमी झाले असून कॉम्प्युटर, मोबाईलवर खेळ खेळण्यात आजची मुले वेळ घालवितात. घराबाहेर पडल्यानंतर सूर्यप्रकाशामधून चालण्याचा चांगल्या व्यायामाचा प्रकार कोणीही मुद्दामहून करीत नाही.

मानवी शरीर प्रक्रियेमध्ये सूर्य प्रकाशाचा अभाव असल्याने अनेक आजार-रोग निर्माण होण्यास वेळ लागत नाही. उन्हात चालण्याचे, उन्हात कष्ट करण्याचे, श्रम करण्याचे प्रयत्न प्रत्येकाकडून व्हायला पाहिजेत. परंतु उन्हामध्ये जाण्याचे टाळले जाते विंâवा ऊन शरीरावर पडणारच नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जाते. ही सवय मानवाच्या शरीरात विकृती तयार करणारी आहे. उन्हात गेल्यानंतर शरीर काळवंडण्याच्या शक्यतेमुळे आणि उन्हात गेल्यावर शारीरीक त्रास होण्याच्या गैरसमजामुळे सूर्यप्रकाशापासून दूर राहणं मानवासाठी घातक ठरू शकतं. याची जाणीव आज प्रत्येकाला आहे. तरीही आळसामुळे आम्ही सूर्य प्रकाशापासून दूर राहतो. दररोज सूर्य प्रकाशाचा लाभ घेता आला तर शरीरासाठी फारच चांगले. ते शक्य नसल्यास एका आठवड्यामध्ये चार ते पाच तास सूर्यप्रकाशामध्ये राहायलाच पाहिजे. दुपारी १ ते ३ या वेळेमध्ये सूर्य किरणं प्रखर असतात. त्यामुळे तो काळ शक्यतो टाळावा. परंतु ज्यांना ऊन्हाची सवय आहे ते त्याही काळामध्ये सूर्यप्रकाश घेऊ शकतात.

सूर्यप्रकाशामध्ये उभं राहण्यापेक्षा सूर्यप्रकाशमध्ये चालणं विंâवा सूर्यप्रकाशात श्रम करणं दुप्पट फायदेशीर ठरतं.

मानवाच्या शरीरामध्ये ‘ड’ जीवनसत्व अत्यंत महत्वाचं काम करतं. हाडाच्या वाढीसाठी, हाडांच्या ताकदीसाठी ‘ड’ जीवनसत्व फारच आवश्यक असून हे ‘ड’ जीवनसत्व सूर्यप्रकाशात गेल्यामुळे शरीरात तयार होतं. आपल्या शरीरामध्ये निरनिराळ्या रासायनिक प्रक्रिया चालतात. शरीरातील ३५० पेक्षा जास्त रासायनिक प्रक्रियेमध्ये ‘ड’ जीवनसत्व लागतंच. नाहीतर त्या प्रक्रियेमध्ये विकृती उत्पन्न होते. म्हणूनच शरीराच्या प्रत्येक क्रियेसाठी आणि प्रत्येक भागासाठी ‘ड’ जीवनसत्व अत्यंत आवश्यक आहे. हे जीवनसत्व प्रमाणापेक्षा कमी असल्यास शरीरामध्ये नानाविध रोग उद्भवतात म्हणून टेस्टमध्ये जीवनसत्व ‘ड’ कमी आढळल्यास त्वरीत डॉक्टरी सल्ला घ्यावा. कृत्रिमरित्या बनविलेलं ‘ड’ जीवनसत्व घेता येतं; पण त्याचा दर्जा सूर्यप्रकाशात तयार होणाऱ्या ‘ड’ जीवनसत्वापेक्षा कित्येकपटीने कमी असतो. डॉक्टरच्या सल्ल्याने घेतलेले कृत्रिम ‘ड’ जीवनसत्व हा तात्पुरता विलाज आहे. तर सूर्यप्रकाशात चालणे, धावणे, श्रम करणे ह्यामधूनच `ड’ जीवनसत्व निरंतर मिळत राहते. सूर्य प्रकाश ही आपणास अगदी मोफत मिळणारी गोष्ट आहे.

पाश्चात देशांमध्ये सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी अंगावर कमीत कमी कपडे घालून सूर्यप्रकाशात तेथील लोकं जातात. त्यांच्या कपड्यांची, बोलण्याची, खाण्याची, पिण्याची सवय Fashion म्हणून आम्ही स्वीकारतो; पण सूर्यप्रकाश घेण्याची सवय शरीराला, मनाला लावत नाही.

‘ड’ जीवनसत्व उचित प्रमाणात नसल्यास अनेक आजारांना सामोरं जावं लागतं.

१) मधूमेह-Diabetes होतो किंवा होण्याची शक्यता वाढते.
२) पचनक्रिया बिघडते.
३) शरीरातील विकृत Cholesterol वाढतं.
४) रक्तवाहिन्या अरुंद होतात व चरबी साठते. त्यामुळे Strokes (अर्धांगवायू), Paralysis, Heart attack असे गंभीर आजार होतात.
५) विविध प्रकारचे कर्करोग (Cancer) होऊ शकतात.
६) स्थूलपणा वाढतो.

आपल्या शरीरात जीवनसत्व ‘ड’ चे पाच प्रकार असतात. त्यापैकी ड-३ (cholecalciferol) हे प्रमुख जीवनसत्व तयार होण्यासाठी शरीरावर
सूर्यप्रकाश पडणे गरजेचं आहे. शीतकटीबंधामधील देशांमध्ये जेमतेम ३ ते ६ तास सूर्यप्रकाश असतो. उदा. लंडनवासियांना प्रतिवर्षी सरासरी सुमारे १९०० तास सूर्यप्रकाश मिळतो. तर महाराष्ट्रात २९०० तास सूर्यप्रकाश मिळतो. तो सूर्यप्रकाश मानवासाठी सहजतेने आरोग्यदायी जीवन प्रदान करतो.
वयोवृद्धांमध्ये हाडे ठिसूळ होऊ नयेत म्हणून कॅल्शियमचे शोषण नीट व्हावे लागते. त्यासाठी व्हिटॅमिन ‘डी’ आवश्यक असते.

लहान मुलांची वाढ उत्तम व्हावी, त्यासाठी व्हिटामिन ‘डी’ महत्वाचं आहे. कारण ह्याच्या अभावी बालकांमध्ये `रिकेट्रस’ नामक हाडांची व्याधी जडते. हाडांमध्ये ठिसूळपणा आणि बाक येतो.

आहारामधून शरीराला मिळणारे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त (झिंक) आतड्यातून शोषून घेताना व्हिटॅमिन `डी’ ची मदत होते.

सूर्यप्रकाशाच्या उर्जेमुळे तयार होत गेलेले सेरॉटेनिन हे एक महत्वाचे रसायन मज्जातंतूमार्पâत मेंदूकडे आवश्यक ते संदेश पाठविण्याकरिता
न्युरोट्रान्समीटर म्हणून कार्य करते. ह्याला हॉर्मोन्स म्हणूनही ओळखले जाते. याच्या अभावी भूक आणि झोप बरोबर लागत नाही. विस्मरण होणे, चिडचिडपणा येणे, कुठल्याही कामावर मन न लागणे, उदासिनता येणे इत्यादी प्रकार सुरू होतात.

डोळ्यांचे आजार दूर ठेवण्यासाठी सूर्यप्रकाश हितकारक ठरतो. कारण दृष्टीशी संबधित असलेले मज्जातंतू मेंदूकडील एका ग्रंथीला पुरेशा प्रमाणात सेटॉटेनिनपासून मेलॅटोनिन नामक हार्मोन्स तयार करण्याचा संदेश देतात. शांत व गाढ निद्राधीन होण्यासाठी या रसायनाचा उपयोग होतो. मेलॅटोनिन रात्री झोपल्यावरच तयार होते.

पुरूषांना प्रोस्टेट ग्रथीचा कर्करोग होण्याची शक्यता सूर्य प्रकाशामुळे नाहीशी होते.

कॉर्टिसॉल नावाचे एक हॉर्मोन आपल्या मनात तणाव निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरते. यामुळे शारीरिक वजन वाढते. सूर्यप्रकाशामुळे कॉर्टिसॉल तयार होण्याचे प्रमाण घटते, असे अनुमान कोलोरॅडो विद्यापिठातील संशोधकांनी काढले आहेत.

आपल्या त्वचेमध्ये नायट्रेटचे प्रमाण पुरेसे असते. सूर्यप्रकाशामुळे त्याचे नायट्रिक ऑक्साईड (एन ओ) या वायूत रूपांतर होते. हा उत्तम प्रकारे मेंदूशी विविध संदेशाची देवाणघेवाण करतो. साहाजिक हृदय आणि मेंदू तल्लख राहतो. हे संशोधन १९९८ मधील ‘नोबेल’चे मानकरी फर्शगॉट मुराद आणि इग्नाशे यांनी केले. हाच एन ओ वायू रक्तात मिसळला की, रक्तवरहिन्या सुक्ष्म प्रमाणात प्रसारण पावतात. रक्तदाब काहीसा कमी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

`ड’ जीवनसत्वामुळे शरीरात कॅल्शिअमचे संतुलन राखले जाते. कॅल्शिअम हे हाडांच्या ताकदीसाठी अत्यावश्यक आहेच. याखेरीज मज्जातंतूंमधील संज्ञावहन, स्नायूंचे आवुंâचन, हृदयाचे स्पंदन, रक्त साकळणे, अन्नपचन, तसेच संप्रेरकांची कार्यक्षमता यासाठीही कॅल्शिअम अत्यावश्यक आहे.

`ड’ जीवनसत्वही शरीरात संप्रेरकासारखे (हॉर्मोन) कार्य करते. शरीरातल्या सर्वच पेशींची वाढ होण्यासाठी आणि त्या कार्यक्षम होण्यासाठी `ड’ जीवनसत्व आवश्यक आहे. त्यामुळेच स्नायूंचीही ताकद राखली जाते. अशक्त स्नायूंमुळे धडपडून हाडे मोडण्याची शक्यता जास्त. या कमजोरीमुळे खाली सहजपणे बसता येत नाही. बसले तर उठता येत नाही. चालताना बदकासारखी छोटी फाकलेली पावले पडतात आणि तोल सांभाळता येत नाही. वयस्कर स्त्रियांमधली पाठदुखी अनेकदा अपुऱ्या `ड’ जीवनसत्वामुळे होते. `ड’ जीवनसत्व स्वाभाविक प्रतिकारशक्तीला बलवान बनविते. त्यामुळे टीबी (क्षय) सारख्या जंतूंचा प्रतिरोध होऊ शकतो. संग्रहणीसारख्या प्रतिकारशक्तीच्या आजारातही त्याचे महत्त्व आहे.

पुरेशा `ड’ जीवनसत्त्वामुळे आमवात, संधिवात होण्याची शक्यता कमी असते आणि झाला तरी तो कमी तीव्रतेचा असतो. ब्लडप्रेशर, मधुमेह, भ्रमिष्ठपणा (स्कीझोफ्रेनिया) आणि उदासीनता (डिप्रेशन) तसेच छाती, आतडे, प्रोस्टेट इत्यादींच्या कॅन्सरमध्येही `ड’ जीवनसत्वाची कमतरता; हे एक कारण मानले जाऊ लागले आहे.

अशा ह्या सूर्यप्रकाशाचे आध्यात्मिक महत्वही आहे. म्हणून १३ डिसेंबर २०१४ रोजी `आपले आरोग्य’वर झालेल्या व्याख्यानात परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणतात की, सकाळचा सूर्यप्रकाश म्हणजे सूर्योदयाच्या आधीचा म्हणजे आश्विनीकुमार म्हणजेच देवांचे वैद्य. त्यांचा स्पर्श झाला की कुठलेही आजार होत नाहीत. असे अश्विनी कुमार म्हणजे सकाळचं eletro mgagnetic field.

मानवाच्या शारीरिक, मानसिक क्रियेमध्ये सूर्यप्रकाशाचे महत्व खूप आहे. सूर्य प्रकाशाला दुसरा पर्याय नाही म्हणूनच सूर्यप्रकाश शरीरावर घेतलाच पाहिजे.

-नरेंद्रसिंह हडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page